आदरणीय मा. मंत्री श्री. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब यांनी कोपरगाव तालुका व परिसरातील आदिवासी समाजातील लोकांचे आयुष्य उज्वल करण्याची इच्छाशक्ती म्हणून त्यांनी आपल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत हि आदिवासी आश्रमशाळा सुरु केली आहे. गेल्या १७वर्षात आमच्या या शाळेने यशाचे शिखर गाठण्याची जिद्द मनात ठेवलेली आहे आमच्या शाळेचे यश असेच बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Saturday, August 29, 2015
रक्षाबंधन
दि. २९ ऑगस्ट २०१५ .
दरवर्षीप्रमाणे आमच्या आश्रमशाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संजीवनी अध्यापक विद्यालयाच्या छात्र शिक्षकांनी शाळेत येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. या प्रसंगी छात्र अध्यापकांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांना खाऊचे वाटप केले. असा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सयुक्तिकरित्या संजीवनी अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक श्री. दरांगे सर व आश्रमशाळेचे शिक्षक श्री. शिंदे सर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे व्यवस्थापक श्री. जोशी सर , मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. साळुंके तसेच दोन्ही विद्यालायचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी श्रीम. धामणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले . तसेच सर्वांच्या आग्रहास्तव श्री. दरांगे सर यांनी "या जगण्यावर शतदा प्रेम करावे " व फुलो का तारो का" या गीतांचे आपल्या मधुर आवाजात सादरीकरण करून सर्व सभागृह मंत्रामुघ्ध करून टाकला.
Subscribe to:
Posts (Atom)
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला दि.१५ ऑगष्ट २०१७ रोजीचे क्षणचित्रे...
-
आमच्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब ...
-
बँक ऑफ बडोदा शाखा कोपरगाव यांच्या वतीने आमच्या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीची गुणवंत विद्यार्थिनी कु. सोनाली निकम हिचा सत्कार कर...










