Thursday, March 26, 2015

इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

         सन २०१४-१५ च्या शैक्षणिक वर्ष-: या वर्षीच्या इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम  दि. २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना निरोप देतेवेळी अतिशय भाऊक वातावरण या प्रसंगी झाले होते. शाळेचे व्यवस्थापक श्री. व्ही.डी. जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन व महत्व पटवून दिले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व उपदेशपर माहिती सांगितली.
         या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सदर केली. त्यात प्रामुख्याने कु. दुर्गा दुटटे, बालिका गायकवाड, रामनाथ आहेर, सोमनाथ माळी यांनी आपल्या विद्यालयातील आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री. लंगोटे सर, शिंदे सर यांनीही विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. 
  इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकवृंद

स्वातंत्र्यदिन २०१९

स्वातंत्र्यदिन २०१९